तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | हदगाव तालुक्यातील मौजे सावरगाव (माळ) येथे मुबलक पाणी साठा असूनही, पाण्याचे अपव्यय झाल्याने येथील बारमाही तलाव ऐन उन्हाळ्यातच कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे ग्रामस्थांवर भीषण पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. रखरखत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
अगदी घाटमाथ्यावर वसलेलं जवळपास सहा हजार लोक वस्तीचे हे खेडेगाव आहे. गावाजवळच खूप जुना तलाव असून, या तलावाची साठवण क्षमता बऱ्यापैकी आहे. या तलावातील साठवण पाणी आजवर शेतीसाठी सोडले जात नसल्याने, योग्य देखभाल व काटकसरीमुळे पाण्याचे

सावरगाव (माळ) ग्रामपंचायतीने पाण्याचे नियोजन केले नसल्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी दिवसभर ताटकळत बसावे लागते. तर विहिरीही कोरड्या पडल्या आहेत.

स्रोत उन्हाळ्यातही टिकून राहत असत. गावकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवत नसे. परंतु, यावर्षी, या तलावातील साठवण पाण्याचा रब्बी हंगामासाठी वापर झाला आहे.
पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होण्याने, या तलावाने लवकरच तळ गाठला आहे. यामुळे या तलावाजवळ असलेली सार्वजनिक पाणीपुरवठा नळ योजनेची विहीर कोरडी पडली आहे.
शिवाय, या तलावाच्या पाण्यावर अवलंबून असलेले, डाक्याची वाडी, धन्याची वाडी, ठाकरवाडी, पळसवाडी, महालिंगी तांडा, या गावच्या पाळीव जनावरा बरोबरच
पाईपलाईन फोडण्याची गरज नव्हती…
पाणीपुरवठा नळ योजनेच्या विहिरीला पाणी आहे. पण गावात राजकारण चालू आहे. पाणंद रस्ते का करत नाहीत म्हणून गावकऱ्यांनी पाईपलाईन फोडली आहे. पाईपलाईन फोडण्याची काय गरज आहे. यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचे तहसीलदार सुरेखा नांदे यांचे म्हणणे आहे. तर मी नवीनच या गावात जॉईन झाले आहे, त्यामुळे या काळात पाणी टंचाई निर्माण होईल अशी कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया ग्रामसेविका श्रीमती शेंबोलीकर यांनी दिली आहे.
वन्यजीव प्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय वाढली आहे. तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईच्या झळा बसू नयेत म्हणून, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दोन वेळा, आमदार, बाबुराव को हळीकर यांनी एक वेळापाणी टंचाई आढावा बैठक घेऊनही, या गावात
भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या तळ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे, परंतु त्यातही काहीजण जे.सी.बी. चालकाकडून काही ठराविक रक्कम उकळण्याचा प्रयत्न करत असल्याची कुजबुज गावात सुरू आहे.
##सत्यप्रभा न्यूज नांदेड##