तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी !
महाराष्ट्रात गंभीर आजारांवरील उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी (CM Relief Fund), टाटा ट्रस्ट (Tata Trusts), आणि सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट यांसारख्या प्रमुख सेवाभावी संस्था व शासकीय योजनांतून आर्थिक मदत मिळते। या संस्था गरीब, गरजू रुग्णांना थेट अनुदान, औषधे आणि शस्त्रक्रियेसाठी निधी पुरवून उपचारांचा मार्ग सुकर करतात.
काही वेळा अनेक योजना असताना देखील योजनेत रुग्ण बसेपर्यंत देखील रुग्णाला खर्च करण्यासाठी पैसे नसतात त्यावेळी हदगाव तालुक्यातील अनेक जण अनेक संस्थेच्या सामाजिक कामाला पाहून आर्थिक मदत करतात. महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही देखील अशाच प्रकारे रुग्णाला मदत करण्यासाठी पुढाकार घेत अनेकांना मदत करत आहे. हदगाव येथील
विठ्ठल त्र्यबंकराव महाजन रा.संभाजी नगर हदगांव.भाजीपाला विकून उदरनिर्वाह.उत्पन्नांचे इतर कुठलेही साधन नाही.यांच्या शरिरात दोन मेजर ब्लाॅकेज निघालेले आहेत.नांदेड येथील आयोजित कॅम्पमध्ये आॅपरेशन करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा नसल्यामुळे त्यांना डाॅक्टरांनी हैद्राबाद किंवा औरंगाबाद येथे जाण्याचा सल्ला दिलेला आहे.
पुढील उपचारासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.
तरी विठ्ठल महाजन यांचे प्राण वाचविण्यासाठी महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सर्व दात्यांसह समाजातील सर्व दानशुरांनी सहकार्य केल्याने त्यांना दि ११ मार्च २०२६ रोजी नऊ हजार रुपयाची मदत करण्यात आली. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप तुपकरी संस्थेचे सदस्य दिलीप तुपकरी, कार्तिक तुपकरी यांनी हदगाव येथील संजीवनी समाधी मठ संस्थान चे मठाधिपती श्री श्र. ब्र.प्र.शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या स्वाधीन केली. त्यावेळी नगरसेवक हूलकाने, फोटोग्राफर गजानन लकडे, सोनबाराव गुडूप, सोनू मुखेडी गोजेगावकर, सुरभी इलेक्ट्रॉनिक चे मालक भोरे यांच्या सह अनेकजन उपस्थित होते. दर वेळेस संदीप तुपकरी यांच्या एका शब्दावर अनेक सदस्य मदतीला धावून येतात त्या सर्व दानशूर व्यक्तींचे त्यांनी आभार मानत त्यांचे नाव जाहीर केले. त्यामध्ये , अंकुशराव ५०रु,मंगनाळे सर नगरपरिषद १ हजार,रमाकांत गोंड १००,सुनील टाले १००,उमाकांत प्रभाकर ५०, तानाजी वाकोडे ५००,योगेश स्वामी २१, सोमेश्वर चंदनकेरे ५०,अनिल धामणकर ५००,चंद्रशेखर उंबरे २००, जिजाबाई संग्राम लोंले ५०,सुनील देसाई यांच्याकडून ५०,माधव हिंगमिरे २००, रामेश्वर पळसेकर १००,दत्तराव धरमुरे ५००,अभिजीत गुळवे २०, प्रभाकर चिंचोलकर ५००, रामचंद्र फळेगावकर २००, सच्चिदानंद साखरे १००, रविकांत गोपाळराव माटाळळकर १०००,विशाल मुदकन्या २०,शिवाजी जगडे १००,योगेश पेटकर २००,रेखा बालाजी वाकोडे /वाकोडे अरविंद दादाराव २००,अशोक डोंगरे १००,
विशाल महजन २००, रोहीत बसवराज मुस्ती १००,dysp गायकवाड ५०० , सुरभी इलेक्ट्रॉनिकचे मालक भोरे यांनी दोन हजार रुपये मदत केली वेळेवर मदत देता यावी यासाठी संस्थेच्या खात्यामध्ये भरपूर पैसे असायला हवे त्यासाठी दानशूर व्यक्तीने संस्थेला मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

सत्यप्रभा न्यूज नांदेड












