तुषार कांबळे! हदगाव प्रतिनिधी!
हदगाव तालुक्यातील तामसा बाजारेठ जवळच असलेल्या वडगांव (बु.) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील सौर ऊर्जेचे वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली येत आहे.
हदगाव तालुक्यातील वडगांव (बु.) शिवारात 3 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे येथील महीला शेतकरी गंगाबाई शिवाजी दुगाळे यांचे शेत गट नंबर २५/२६ मध्ये कुसुम सोलार योजनेअंतर्गत सौर ऊर्जेचे पॅनल प्लेट बसविण्यात आले होते. वादळी वाऱ्यामुळे सौर ऊर्जेच्या पॅनल प्लेट उडून गेले. तर काही
पॅनल प्लेट वाकून व मोडून प्रचंड नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
## सत्यप्रभा न्यूज नांदेड ##





















