प्रशासन व संबधित गुत्तेदाराच्या आठमुठ्या धोरणामुळे कामं ठप्प
नांदेड दि.२४ शहरातील महत्वपूर्ण व जुनी नागरी वसाहत असलेल्या मित्र नगर ,गोपाळ नगर, सखोजी नगर याभागात मागील काही महीन्यापूर्वी अम्रुत २.० अंतर्गत ड्रेनेज चे काम नांदेड येथील शारदा कन्स्ट्रक्शन मार्फत करण्यात आले पण हे काम करताना सदरील गुत्तेदार ने मुळ नाली च बंद करून टाकली आहे अशी तक्रार या भागातील रहीवाशी अंबादास सांडवे यांनी केली आहे
त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधीत कन्स्ट्रक्शन कंपनी चे मैनेजर वानखेडे यांना मागील एक महीन्यापासुन येथील नागरीक फोन वर रोज संपर्क करुन नाली दुरुस्ती करून देण्यासाठी विनंती करतात पण सदरील सुपरवायझर कोणताही प्रतिसाद देत नाही सध्या पावसामुळे ह्या ऐरीयात सगळीकडे नाल्यातुंबल्या आहेत व जिकडे तिकडे घाणिचे साम्राज्य पसरले. हा भाग सखल असल्यामुळे व पाणी जाण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी येथील लोकांच्या घरात जाण्याची शक्यता आहे कारण या परिसरात मागील काळात नाली असतांनाही पाणी घरात शिरल्याचा ईतिहास आहे आणि यावेळेस तर मुख्य नालीच बंद करण्यात आली आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात एकंदरीत परिस्थिती कठीण होईल असे दिसून येत आहे
जर नाली चे पावसाचे पाणी येथील नागरीकाच्या घरांत गेले तर ह्या संबंधी तिव्र आंदोलन करण्यात येईल व यास संबंधित गुत्तेदार व सुपरवायझर जबाबदार असतील सदरील गुत्तेदार ने दोन दिवसांत नाली दुरुस्ती करून न दिल्यास आयुक्तांकडे निवेदन देऊन संबंधित गुत्तेदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात येईल अशी सूचना या भागातील रहीवाशांनी केली आहे ..
नांदेड उत्तर च्या आमदार साहेबांनी मित्रनगरातील नागरी समस्यांत लक्ष घालावे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही व आमच्या भागातील रहीवाशांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत मोठे मताधिक्य त्यांना दिले आहे व हे सर्व मतदान हे त्यांच्या निवडणुकीत निर्णायक साबित झाले आहे अशा एकनिष्ठ भागात आमदार साहेबांनी वैयक्तिक लक्ष घालून सदरील समस्या तातडीने मार्गी लावावी अशी विनंती आहे . अंबादास सांडवे , स्थानिक रहीवाशी , मित्रनगर , नांदेड
#सत्यप्रभा न्युज #नांदेड