दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि. ११ जून : नुकतेच काही दिवसांपासून आपल्या धर्माबाद नगरपरिषद कार्यालयातर्फे प्लास्टिक विरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. प्लास्टिक हे अविघटनशील पदार्थ असल्याने पृथ्वीसाठी धोकादायक आहे त्यामुळे शासनाच्या पर्यावरण विभागातर्फे प्लॅस्टिकच्या वापराबाबत काही नियमावली तयार केलेली आहे. प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी पिशव्या किती मायक्रॉनच्या असाव्यात याबाबतही निर्देश दिलेले आहेत.
मात्र या नियमांना फाटा देऊन कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरिबॅग वापर नेहमी सर्रास दिसून येतो. त्याविरुद्ध नगर पालिकेच्या वतीने प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर होत असलेल्या दुकानांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली मात्र या कारवाईत छोटे व्यापारी, दुकानदार,फेरीवाले किंवा भाजीपाला विक्रेते यांना लक्ष्य करण्याऐवजी हे व्यापारी ज्या ठिकाणाहून कॅरीबॅगची किरकोळ प्रमाणात खरेदी करतात त्या अनाधिकृत होलसेल (ठोक) विक्रेत्यावर उचित कारवाई करून ही मोहीम यशस्वी करावी. परिणामतः उपरोक्त विनंती प्रमाणे कारवाई केल्यास प्लास्टिकचा मोठा साठा जप्त होऊ शकतो त्याबरोबर छोटे व्यवसायिकांना आर्थिक फटका बसणार नाही अशी मागणी मा.मुख्याधिकारी नगर परिषद धर्माबाद यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यासंबंधीचे निवेदन पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सज्जन,गंगाप्रसाद सोनकांबळे,राजेश सोनकांबळे यांच्या वतीने सादर करण्यात आले आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!