हिंगोली: गजानन महाराजांच्या पालखीचा हिंगोली जिल्ह्यातून पायी प्रवास सुरु आहे. पालखीमध्ये तब्बल साडेसातशे वारकरी सहभागी झाले आहेत. या पालखीचा ड्रोन च्या माध्यमातून आढावा घेतलाय. विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावमधील गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे.हिंगोली जिल्ह्यांमध्ये या पालखीचा आजचा तिसरा आणि शेवटचा मुक्काम आहे. आज पालखी जवळा बाजार या ठिकाणी मुक्कामी असेल.हिंगोलीत टाळ मृदंगाच्या आवाजाने भक्तिमय वातावरण झालेय. गुरुवारी ही पालखी परभणी जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल.या पालखीमध्ये एकूण साडेसातशे वारकरी सहभागी झाले असून आषाढी एकादशीनिमित्त ही वारी पंढरपूरला पोहोचत असते. एका महिन्यामध्ये साडेपाचशे किलोमीटरचा पायी प्रवास करून ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे. या वर्षीचे वारीचे हे 51वे वर्ष आहे. बुधवारी रात्री या पालखीचा मुक्काम हिंगोलीचा डिग्रस कऱ्हाळे या गावांमध्ये झाला असून पुढील पायी प्रवासासाठी पालखी निघाली आहे.
अत्यंत शिस्तीत चालणारे वारकरी पांढरे शुभ्र कपडे आणि हातात भगवा झेंडा हे या वारीचे वेगळेपण असतं.अत्यंत शिस्तीत चालणारे वारकरी पांढरे शुभ्र कपडे आणि हातात भगवा झेंडा हे या वारीचे वेगळेपण असतं. हातात टाळ आणि मृदुंग विठ्ठल नामाचा जयघोष अशा या भक्तीने वातावरणामध्ये ही पालखी मजल दरमजल करत पंढरपूर कडे प्रवास करत आहे. . # सत्यप्रभा न्यूज # नांदेड