नांदेड दि.२८ जून : नांदेड जिल्ह्याच्या पोलीस दलात सध्या एका मोठ्या बदलाचे वारे वाहत आहेत. जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षक म्हणून डॉ. नीलाभ रोहन यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला असून, पदभार स्वीकारताच त्यांनी आपल्या कार्यशैलीची चुणूक दाखवून दिली आहे. [१] त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या पहिल्याच महत्त्वपूर्ण बैठकीत सर्वांना अत्यंत कडक शब्दांत तंबी दिली आहे. या बैठकीचा मुख्य सूर हा जिल्हयातील अवैध धंदे पूर्णपणे मोडीत काढणे हा होता.अधिकचाऱ्यांना कडक तंबी आणि स्पष्ट संदेशडॉ. नीलाभ रोहन यांनी पोलीस अधिकाऱ्यांना संबोधित करताना अत्यंत स्पष्टपणे सांगितले की, त्यांना कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. या विधानाचा सरळ अर्थ असा की, पोलीस दलातील भ्रष्टाचार किंवा चुकीच्या मार्गाने येणाऱ्या लाभांना त्यांनी पूर्णपणे नकार दिला आहे.त्यांनी अधिकाऱ्यांना गोड समज देताना हे स्पष्ट केले की, जिल्ह्यामध्ये मटका, गुटखा, जुगार आणि विशेषतः वाळूचे सर्व प्रकारचे अवैध धंदे तातडीने बंद झाले पाहिजेत. सोबतच भू माफिया लोकांवर डॉ. नीलाभ रोहन यांचे लक्ष असण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जर कोणी अधिकारी अशा धंद्यांना पाठीशी घालत असेल किंवा त्यात सामील असेल, तर त्यांची गय केली जाणार नाही, असाच इशारा या तंबीतून देण्यात आला आहे.माजी पोलीस अधीक्षकांची बदली आणि वाळू प्रकरणाची चर्चाडॉ.नीलाभ रोहन यांच्या नियुक्तीसोबतच माजी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या बदलीची चर्चाही नव्याने जोर धरू लागली आहे.अबिनाश कुमार यांची बदली ही वाळू माफियांनी केलेल्या तक्रारीवरून झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाळू उत्खनन आणि त्यातील अवैध व्यवहार हा नांदेड जिल्ह्यात नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. अविनाश कुमार यांची बदली रद्द व्हावी यासाठी अनेक आमदारांनी थेट मुंबई गाठली होती आणि त्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते, परंतु त्यांना यात यश आले नाही.राजकीय दबाव असूनही ही बदली न थांबल्यामुळे पोलीस वर्तुळात आणि जनतेत या प्रकरणाची मोठी चर्चा आहे.अविनाश कुमार यांचा निरोप आणि जनतेची प्रतिक्रियाआपला पदभार सोडताना आणि निरोप घेताना अबिनाश कुमार यांनी आपण आपल्या कारकिर्दीत चांगले काम केल्याचा दावा केला. त्यांनी सर्वांचे आभार मानत असताना आपल्या कामाचे समाधान व्यक्त केले. मात्र, सर्वसामान्य जनतेची प्रतिक्रिया यापेक्षा काहीशी वेगळी असल्याचे दिसून येते. प्रशासकीय स्तरावर आणि लोकभावनेमध्ये त्यांच्या कामाबद्दल संमिश्र सूर आहेत. आता अविनाश कुमार यांची रवानगी पुणे येथे
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!





















