छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी | विजय पाटील | वाळूज एमआयडीसीतील(MIDC) अनेक कंपन्या केमिकलची योग्य विल्हेवाट न लावता तलावात सोडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे जलसाठे प्रदूषित होतात. पिण्याच्या पाण्यातही केमिकल उतरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मात्र याकडे संबंधित यंत्रणेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत(Crime News) असल्याचा आरोप होत असतो. वाळूज एमआयडीसी परिसरातील वंजारवाडीत तळ्यात केमिकल सोडण्यास विरोध केला म्हणून कंपनी मालकाच्या नातेवाइकांनी सरपंचावर जीवघेणा हल्ला चढवला. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, चाकूचे वार केले. जखमी सरपंचावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेमुळे या विषयाची तीव्रता वाढली असून, आता तरी यंत्रणा सरपंच रामेश्वर गोविंद बोंडारे (वय ४२, रा. वंजारवाडी, वाळूज एमआयडीसी परिसर, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. २६ एप्रिलला दुपारी एकच्या सुमारास बनकरवाडीतील तळ्यात केमिकल सोडले जात असल्याचे त्यांना कळले. त्यांनी लगेचच ओळखीचे श्याम गायकवाड व पत्रकारांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. ही केमीकल असलेली कंपनी कोणाची आहे, असे विचारले असता तेथे काम करणाऱ्या लोकांनी ती योगेश सांगळे याची असल्याचे सांगितले. पोलीस कर्मचारीसुद्धा तेथे आले.
सरपंच बोंडारे तिथून जात असताना बाबासाहेब सांगळे, संभाजी सांगळे, गणेश सांगळे, अमोल सांगळे, रावसाहेब सांगळे, पारुबाई सांगळे यांनी त्यांना गाठून हाताचापटांनी, लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. छोट्या चाकूने त्यांच्या पाठीवर वार केले. त्यांनी धमकी दिली की, तू गावात आल्यानंतर जीवे मारल्याशिवाय सोडणार नाही. पारुबाईने धमकी दिली की, माझा मुलगा केमीकलचे काम करो किंवा काहीही करो, तुला काय घेणे देणे आहे… सरपंच बोंडारे यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन घडलेल्या घटनेची तक्रार दिली.
पोलिसांनी त्यांना मेडीकल मेमो देऊन घाटी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणात बाबासाहेब सांगळे, संभाजी सांगळे, गणेश सांगळे, अमोल सांगळे, रावसाहेब सांगळे, पार्वतीबाई सांगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर