• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Monday, April 13, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

बुद्धाची करुणामय नैतिकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन व्हिजनचा आधार : डॉ. सुखदेव थोरात

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
11 January 2026
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1508756288 1768141054751
32
SHARES
214
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

“कल्चरल”ची फुले-शाहू -आंबेडकर- अण्णाभाऊ साठे व्याख्यानमाला – पहिले पुष्प

नांदेड दि.११ जानेवारी: “बुद्धाची करुणामय, मानवतावादी आणि विवेकाधिष्ठित नैतिकता हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन व्हिजनचा कणा आहे,” असे ठाम प्रतिपादन सुप्रसिद्ध विचारवंत व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी केले. कल्चरल असोसिएशनच्या वतीने आयोजित फुले–शाहू–आंबेडकर–अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेत “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील रिपब्लिकन व्हिजन” या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विठ्ठल खाडे हे होते.
यावेळी मंचावर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड, अपर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, भदन्त विनय बोधीप्रिय महाथेरो, किशोर खांडेकर, डॉ. गौतम कांबळे, संजय शेंडे, विमल नवसागरे, कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोणारकर, सचिव डॉ. विजयकुमार माहुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. थोरात म्हणाले की, बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्ष व संघटना जर बाबासाहेबांचे विचार प्रमाण मानत असतील, तर एकाच विचारधारेवर आधारित इतक्या वेगवेगळ्या संघटना का निर्माण झाल्या, हा गंभीर प्रश्न आहे. बाबासाहेबांचे विचारांचे वेगवेगळे आकलन मांडल्या जातो त्यातूनही घडले. असे सांगून विषमतेला कारणीभूत असलेली जात ही केवळ सामाजिक रचना नसून ती एक सुसंगत विचारधारा व तत्त्वज्ञान आहे. जातीचा विचार हा भेद, श्रेणीक्रम आणि वर्चस्वावर आधारलेला असून इतिहासकाळापासून विषमता, शोषण आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष सुरू आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विषमतेच्या मुळावर घाव घालण्यासाठी सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्व पातळ्यांवर समतेची रचना उभी करण्याचा विचार मांडला. सामाजिक जीवनात स्वातंत्र्य, समता व बंधुता राजकीय व्यवस्थेत संसदीय लोकशाही, आर्थिक पातळीवर राज्य समाजवाद आणि सांस्कृतिक जीवनात बुद्धाची करुणामय नैतिकता—या चार आधारांवर बाबासाहेबांचे रिपब्लिकन व्हिजन उभे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकशाहीवर नितांत प्रेम असलेल्या बाबासाहेबांना भारतातील विविध धर्म, भाषा व जातींनी विभागलेले सामाजिक वास्तव पूर्णपणे ज्ञात होते. त्यामुळेच इंग्लंडसारख्या राजकीय बहुसंख्याकतेऐवजी भारतात कम्युनल किंवा जातीय बहुसंख्याकतेचा धोका अधिक असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. अशा बहुसंख्याकवादात अल्पसंख्याकांचे हक्क दडपले जाऊ शकतात, ही बाबासाहेबांची गंभीर चिंता होती. म्हणूनच संसदेतून निवडून आलेल्या सर्व प्रतिनिधींनी पंतप्रधानाची निवड करावी आणि मंत्रिमंडळात अल्पसंख्याकांना व्यापक प्रतिनिधित्व मिळावे, असे उपाय त्यांनी सुचविले होते.

आज संविधानालाच नव्हे, तर संविधानातील समतावादी मूल्यांनाच विरोध होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र समता विरुद्ध विषमता हा संघर्ष जुना असून, इतिहास साक्ष देतो की अखेरीस समतेचाच विजय होतो, असे डॉ. थोरात यांनी सांगितले. “हिंदू समाज अस्तित्वात आहे; पण हिंदू धर्म ही नुसती धारणा आहे,” असे बाबासाहेबांचे विधान उद्धृत करत त्यांनी स्पष्ट केले की, जे धर्मराष्ट्र उभारण्याची भाषा करतात, ते प्रत्यक्षात ब्राह्मणी राष्ट्राची संकल्पना पुढे नेत असून त्याचा पाया विषमतेवर आधारित आहे. दलित वंचित शोषित आणि बहुजन समाजासाठी धोकादायक आहे.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. विठ्ठल खाडे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक लोकशाही अजून समाजात पुरेशी रुजलेली नाही. अहंकार आणि आत्ममग्नतेमुळे चळवळी शिथिल झाल्या असून, वैचारिक पातळीवर व्यापक प्रबोधन करूनच या चळवळींना नवसंजीवनी द्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी बोधी वृक्षाच्या रोपट्यास मान्यवरांच्या हस्ते पाणी देऊन उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी करून दिला. सुरुवातीला पंकज शिरभाते आणि सुरेश दादा तळवटकर यांनी सुरेल आवाजात स्वागत गीत गाईले.
सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार माहुरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. पंडित सोनाळे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारोतराव धुतुरे, इंजी. अनिल लोणे, एस. जे. शिरसे, तुकाराम अटकोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

नांदेड येथील “हिंद-दी-चादर” कार्यक्रम ऐतिहासिक करावा

Next Post

प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप पॅनलची भक्कम आघाडी; २० वर्षांचा अनुभव, १० वर्षांची कामगिरी आणि जनतेचा विश्वास एकवटला

Next Post
image editor output image1642456612 1768234419936

प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप पॅनलची भक्कम आघाडी; २० वर्षांचा अनुभव, १० वर्षांची कामगिरी आणि जनतेचा विश्वास एकवटला

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • भारतात पहिल्यांदाच 9 पोलिसांना एकाचवेळी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील एका न्यायालयाने नऊ पोलिसांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही घटना सहा वर्षांपूर्वी घडली होती.लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. 2020 मध्ये तुतीकुडी जिल्ह्यातील साथनकुलम पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला होता. पी. जयराज (वय 51 वर्षे) आणि त्यांचा ३१ वर्षीय मुलगा जे. बेनिक्स यांना 19 जून रोजी कोविड-19 लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. जयराज हे मोबाईल दुकानाचे मालक आहे. परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान उघडे ठेवल्याचा आरोप करत त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती. हा आरोप नंतर खोटा सिद्ध झाला. पोलिसांनी त्यांना साथनकुलम पोलीस ठाण्यात नेले आणि चौकशीच्या नावाखाली रात्रभर त्यांचा निर्घृणपणे छळ केला. नातेवाईकांनी आरोप केला की, त्यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष या प्रकरमात महत्वाचा पुरावा ठरली. पोलीस स्टेशनच्या टेबलावर आणि काठ्यांवर रक्ताचे डाग आढळले होते. नंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, परंतु काही दिवसांतच जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात पोलीस क्रूरतेविरोधात तीव्र संताप उसळला. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला राज्य सीआयडीने केला होता, परंतु मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने तपास हाती घेतला. सीबीआयने एका इन्स्पेक्टर, दोन सब-इन्स्पेक्टर आणि अनेक कॉन्स्टेबल्ससह 10 पोलिसांना अटक केली होती.पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नआरोपींवर खून, कट रचणे आणि पुरावा नष्ट करणे यांसारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले. तपासा दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज देखील हटवण्यात आले. यामुळे  सत्य लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. तपासादरम्यान आरोपींपैकी एका पोलिस उपनिरीक्षकाचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला. सहा वर्षांनंतर, 2026 मध्ये, मदुराई न्यायालयाने खटल्याची सुनावणी पूर्ण केली. मार्च 2026 मध्ये, सर्व नऊ पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले.हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. मात्र, हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीत मृत्यू झाला हे सिद्ध झाले. 6 एप्रिल 2026 रोजी, मदुराई येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाल
  • बिग बॉस 6 सीजनमध्ये आपला पाठिंबा कोणाला आहे?#SatyaprabhaNews #MarathiNews #rakeshbapat #anushreemane #EntertainmentNews bigbossmarathi
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या दुःखद निधनाने गेल्या चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा, आणि मनामनांना एका चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला आहे. आशाताईंचा स्वर कानावर पडला नाही, असा दिवस गेल्या अनेक दशकांत उजाडला नाही, आणि मावळलाही नाही. या स्वराने असंख्य क्षण फुलविले, आणि फुलवत शकुनाच्या मेंदीने रंगलेले जगण्याचे असंख्य क्षण हसविलेदेखील. आशाताई ऐहिकदृष्ट्या आपल्यात नाहीत ही जाणीव पचविणे अवघड आहे, पण त्या स्वरांची सोबत मात्र कायम राहणार आहे. कारण या स्वरांचा साज कालातीत आहे. अनेक वेळा आशाताईंनी भेटण्याचे भाग्य मला लाभले, ते अविस्मरणीय क्षण कायमस्वरूपी माझ्या मनात अजरामर राहतील. -एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री#EknathShinde #ashabhosle #singer #SatyaprabhaNews
  • ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. 12 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मल्टी ऑरगन फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. 11 एप्रिल 2025 रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.#SatyaprabhaNews #AshaBhosale #MarathiNews
  • अजितदादा सहावेळा उपमुख्यमंत्री झाले. भविष्यात सुनेत्रा पवार यांनी अजितदादांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण करावे. सुनेत्रावाहिनींनी मुख्यमंत्री व्हावं. -आदिती तटकरे, मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या#AditiTatkare  #sunetrapawar  #AjitPawar #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10400
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6582
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

1206
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज