तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | हदगाव तालुक्यातील(Hadgaon News) प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष अनिल दिगंबर कदम(Anil Kadam) यांच्या अथक प्रयत्नातून रावणगाव ते लिंगापूर नदीवरील बंधाऱ्याचे बांधकाम मंजूर झाले असून, या बंधाऱ्याचे भूमिपूजन दिनांक १ मे २०२५ रोजी त्यांच्या हस्ते संपन्न झाले.(Prahar Janshakti Paksh)
या कार्यक्रमास रावणगाव व लिंगापूर गावांतील मान्यवर, ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. त्यात रंगराव देशमुख, नारायण देशमुख, पप्पू देशमुख, चंपतराव देवसरकर, वाडेकरसोपान देवसरकर, नरेश दोसरकर, भगवान कदम व वाळकीकर आदींचा समावेश होता. बंधाऱ्याच्या मंजुरीसाठी गेले दोन वर्ष अनिल कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. जलसंधारण विभागाचे अभियंता श्री. राजेश मुरमुरे यांच्या सहकार्याने हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या बाबतीत मोठा दिलासा मिळणार असून, परिसरातील शेतीला पाणीपुरवठा सुयोग्य पद्धतीने होणार आहे.
या कार्यक्रमात बोलताना अनिल कदम यांनी सांगितले, “प्रहार पक्षाच्या माध्यमातून जे कार्य सत्ताधारी पक्ष किंवा इतर राजकीय नेते करू शकले नाहीत, ते आम्ही करून दाखवले आहे. हे केवळ सुरुवात असून, आगामी काळातही शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांसाठी आम्ही सदैव तत्पर राहू.”
तसेच त्यांनी आवाहन केले, “शेतकऱ्यांना कृषी, सिंचन, आरोग्य किंवा इतर कोणत्याही समस्या असल्यास त्यांनी थेट प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. आम्ही बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावर निश्चित उपाय काढू.”